दरम्यान आज विद्यापीठाच्या कुलगुरूंना सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने निवेदन देण्यात आले असून या निवेदनामध्ये म्हटले आहे की, दि. ०९-१०-२०२० व पदव्युत्तरच्या परिक्षा ह्या १४-१०२०२० पासून सुरु झाल्या आहेत. विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये परिक्षा सुरु झाल्या. पण अनेक विद्यार्थी ऑनलाईन व ऑफलाईन परिक्षा पद्धतीमुळे अनेक विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहिले आहेत. म्हणून विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली आहे. आपण विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करुन त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आपण तात्काळ निर्णय घ्यावा. अन्यथा सम्यक विद्यार्थी आंदोलन आंदोलनाचा पवित्रा घेईल, प्रशासनाने नोंद घ्यावी.
या निवेदनावर संकेत कांबळे, जयश्री शिर्के, सिद्धार्थ कांबळे, रोहित जोगदंड, कपिल वानखेडे, राहुल कांबळे, अनिल दिपके, रामेश्वर कबाडे, राहुल खंदारे, गजानन गवई, भागवत चोपडे, रामेश्वर गोरे, अनिल जाधव, रूपाली सावे, अजय कसबे, प्रदीप राजगुरू, सोनू गायकवाड, अशोक बनकर, शैलेश चाबुकस्वार आदींच्या स्वाक्ष-या आहेत.


0 टिप्पण्या