ओबीसींचे आरक्षण हिंदुत्ववादी पक्षानेच.... ; अ‍ॅड. आंबेडकर

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

ओबीसींचे आरक्षण हिंदुत्ववादी पक्षानेच.... ; अ‍ॅड. आंबेडकर

जमावबंदी झुगारून वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा थेट विधानभवन गेट समोर धडकला!



वंचितनामा न्यूज नेटवर्क

मुंबई: या देशात सवर्ण विरूद्ध ओबीसी असा परंपरेचा वाद चालत आलेला आहे. ओबीसी हा हिंदु असूनही तो केवळ संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे सत्तेचा वाटेकरी होवू पाहतो आहे. आणि म्हणुन ज्या मार्गाने हा समूह सत्तेपर्यंत येवू पाहतो आहे तो मार्गच बंद करा, ही नीती भाजपा-आरएसएस या हिंदुत्ववादी पक्षाने आखली असल्याची प्रखर टीका वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. 

आज (दि. २३ डिसेंबर) रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विधानभवनावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात ‘ओबीसी आरक्षणा’संदर्भात मोर्चा काढण्यात आला. 

राज्य सरकारचा जमावबंदी आदेश झुगारून ओबीसी आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा थेट विधानभवन गेटवर धडकला. यावेळी प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, महिला आघाडी उपाध्यक्ष सविता मुंडे, प्रदेश उपाध्यक्ष नागोराव पांचाळ, किसन चव्हाण, अनिल जाधव, सर्वजित बनसोडे, गोविंद दळवी, सिद्धार्थ मोकळे, प्रदेश प्रवक्ते फारुख अहमद, प्रियदर्शी तेलंग, युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा, मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाकिर तांबोळी, उत्तर महाराष्ट्र महासचिव वामनराव गायकवाड, मुंबई प्रदेशाध्यक्ष अबुल हसन खान, महासचिव आनंद जाधव, संघटक विकास पवार आणि राज्यभरातून आलेले हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

ओबीसी आरक्षणासाठी जमावबंदी आदेश झुगारून मोर्चा

राज्य सरकारने मुंबईत जमावबंदी आदेश लागू केला तरी 'वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी विधानसभा अधिवेशनावर मोर्चा काढणार असल्याचे वंचितचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले होते. आज सकाळ पासून मुंबईत येणाNया वंचितच्या कार्यकत्र्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली होती. विधानभवन परिसरात पोलीस बंदोबस्तात प्रचंड वाढ करण्यात आली होती. त्यामुळे वंचितचा मोर्चा विधानभवन पर्यंत पोहचण्या आधीच अडवला जाईल अशी रणनीती पोलिसांनी आखली होती. मात्र वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकत्र्यांनी गनिमीकाव्याने हजारो कार्यकर्ते विधानभवन परिसरात आधीच विखरून उभे केले होते. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांचे विधानभवन गेटवर आगमन होताच कार्यकत्र्यांनी एकत्र येत सरकार विरोधी घोषणाबाजी सुरू केली.

सरकारने विधानसभा अधिवेशनात  ठराव मांडावा

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेचा ठराव राज्य सरकारने विधानसभा अधिवेशनात मांडावा आणि तो ठराव केंद्र सरकारला आणि जनगणना आयोगास पाठवावा तसेच त्यासाठी लागणारा खर्च करायला राज्य सरकार  तयार असल्याचे सांगावे जेणेकरून केंद्राला ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी लागेल आणि त्यातून आवश्यक असलेला इमपीरिकल डेटा प्राप्त होईल.'  केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांची मिलीभगत असून यांनी मिळून ओबीसी आरक्षण संपवण्याचा डाव आखल्याचा आरोप यावेळी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.

महाराष्ट्र सरकारने कोणतेही कारण नसतांना १४४ कलम लावले. पोलीसांच्या आडून सरकारने दाबण्याचा प्रयत्न केला. लोकशाहीची गळचेपी करणारी भुमिका सरकारची असली तरी त्याला शह देवून आज हजारो कार्यकर्ते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या हाकेला साद देत विधानभवनावर धडकले. हा संविधानाचा विजय आहे. महाराष्ट्रातील ओबीसी या मोर्चाकडे आशेने पाहतो आहे. कारण ओबीसींच्या भवितव्याचा प्रश्न आज निर्माण झाला आहे. ओबीसी देशाच्या उद्योग व्यवस्थेचा कणा आहे. परंतु त्याच्या विकासासाठी गेल्या ७५ वर्षांमध्ये केंद्र आणि राज्य सरकार बजेट निर्माण करू शकले नाही. हे आंदोलन एक सुरूवात आहे. इथुन पुढे खरा संघर्ष सुरू होणार आहे. 

- रेखा ठाकूर, प्रदेशाध्यक्षा 

वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र राज्य



ओबीसी समाजाचे आज राजकीय आरक्षण रद्द झालेले आहे. येत्या काळात ओबीसींचे नोकरीत आरक्षण, शैक्षणिक आरक्षण रद्द करण्याचा घाट सरकारने घातला आहे. ओबीसी नेते म्हणवून घेणारे काही बोलायला तयार नाही हे आता ओबीसी समाजाच्या लक्षात यायला लागले आहे. आणि म्हणुन या मोर्चामध्ये ओबीसी समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात गावपातळीपासून ओबीसी आरक्षणासंदर्भातील लढा व्यापक करण्याचा आमचा निश्चय आहे. 

- निलेश विश्वकर्मा, प्रदेशाध्यक्ष

वंचित बहुजन युवा आघाडी, महाराष्ट्र राज्य


आंदोलनकत्र्यांची पोलीसांनी अडवणूक केली असली तरी आपल्या न्याय हक्कासाठी राज्यभरातील ओबीसी बांधव या मार्चामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात उभा राहीला आहे. प्रस्तापित पक्षांमधील ओबीसी नेते ओबीसींबाबत ठोस भुमिका घेतांना दिसत नाहीत त्यामुळे राजकीय आरक्षणाबरोबर ओबीसींचे इतर आरक्षण रद्द होण्याची चिन्हे दिसत आहेत. ही भीती ओळखून ओबीसी समूह श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात लढा द्यायला सज्ज झाला आहे, हे आजच्या मोर्चाने सिद्ध केले आहे.


- अबुल हसन खान, मुंबई अध्यक्ष

वंचित बहुजन आघाडी 


शासनाने आंदोलन दाबण्याचा प्रचंड प्रयत्न केला परंतु साहेबांच्या आदेशानुसार पोलीसांना गाफिल ठेवून हजारो लोक विधानभवनावर धडकले. आणि ओबीसींच्या आरक्षणासाठी यशस्वी आंदोलन केले. ओबीसी, भटक्या-विमुक्तांच्या जनगणनेचा प्रश्न सरकार जाणिवपूर्वक टाळते आहे. परंतु जो पर्यंत जनगणना होणार नाही तो पर्यंत या समूहांना न्याय मिळणार नाही. आजच्या आंदोलनाने सरकार हादरले आहे, एवढे मात्र निश्चित.


प्रा. विष्णु जाधव, ज्येष्ठ नेते तथा

पक्ष शिस्तपालन व तक्रार निवारण समिती सदस्य, वंचित बहुजन आघाडी 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या